पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणीतील माणसं - 10

इमेज
पुस्तकवाले जोशी - श्री. रवींद्र जोशी! आपल्या आयुष्यात माणसं भेटणं याला काही प्रेरणा असावी लागते असे वाटते. कांही माणसं प्रत्यक्ष भेटल्यावर ती काही ऋणानुबंध घेऊन येतात. या सर्वामागे एक ईश्वरी प्रेरणा असते एवढं मात्र खरं. त्याच झालं असं की,मी ऊत्तूरला तिथल्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. साधारण पन्नास वर्षे झाली. मी नवखा होतो. एक दिवस सकाळी 11वाजता प्रार्थना झाली आणि मी माझ्या पहिल्या तासाला निघालो होतो. इतक्यात मागून हाक आली, "अहो,नाईक सर ,जरा ऑफिसमध्ये येता का? थोडं बोलायचं आहे. "आमचे बबनराव ठाकूर सर मला म्हणाले. म्हणून मी त्यांच्या मागून गेलो." एक पाच- साडेपाच फूटांची उंची असलेले, गोरेपान ,सरळ नाक ,केस अकाली पांढरे झालेले, पण मागे विंचरलेले, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, पॅट व पांढरा शुभ्र हाप मॅनिला असे एक गृहस्थ ठाकूर सरांचे समोर खुर्चीवर बसले होते.ठाकूर सरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला, "हे आमचे नाईक सर, यांना साहित्याची आवड आहे." आणि समोरच्या गृहस्थांकडे वळून ते मला म्हणाले, हे रवींद्र जोशी सर .कोल्हापूरला असतात. मौज प्रकाशन गृह यांच...

आठवणीतली माणसं - 9

इमेज
आमच्या शाळेचा जागल्या - श्री. बबनराव ठाकूर! कधी कधी मी एकटाच असतो तेव्हा आपल्याला भेटलेल्या माणसांचे नमुने आठवून अचंबित होतो.किती वेगवेगळे स्वभावधर्म असलेली माणसें . पराकोटीचा द्वेष करणारी, तर कधी म्ऊमुलायम स्वभावाची असतात कांही कांही परोपकारी गंपू सारखी असतात. कांही मनांनी कणखर असतात. कधी छोट्याशा प्रसंगानं हळवी होणारी असतात. परखडपणे बोलणारे पण अंतरंगी फणसासारखे रसाळ असतात. अशा विविध रंगी, नाना कळा असलेल्या माणसांत एक माणूस माझ्या मनांत कायम लक्षात राहिलेला आहे.तो आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे. तसेच तो आमच्या शाळेच्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. शाळेचा रखवालदारच (जागल्या ) म्हणा ना!!कुणीही न सांगता सर्वांच्या हाकेला धावून जाणारा असा हा हवाहवासा वाटणारा माणूस म्हणजे आमचे बबनराव ठाकूर. मुलांचे लाडके ठाकूर सर. या माणसाची माझी भेट झाली ती जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी 1965/66 साल असावे.मी गडहिग्लजला काॅलेजला होतो. आठ पंधरा दिवसांनी सुट्टी मिळाली की ऊत्तूरला आजोळी येत असे. डिसेंबर महिना होता. थंडीचे दिवस होते. आमच्या आजोबांच्या घरी माडीवर ऊत्तूर विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी अभ्यास...

आठवणीतली माणसं - 8

इमेज
एका प्रज्ञासूर्याचे अलौकिक दर्शन! (राष्ट्रसंत आचार्य विनोबाजी भावे!)  प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कांही दुर्लभ योगही येतात. त्यामुळे जीवन उजळून निघते.अधिक संपन्न होते .असेच काही क्षण माझ्या आयुष्यात ही आले. गोष्ट आहे 65 वर्षांपूर्वीची. माझ्या बालपणीची. मी तेव्हा इयत्ता चौथीत शिकत होतो. त्यावेळचे ऊत्तूर हे अगदी छोटेसे गाव होते. आजरा तालुक्यातले . माझ्या आजोळचे वातावरण हे वारकरी संप्रदायाचे, धार्मिक. माझे आजोबा "पंढरीचे" "कार्तिकीचे "वारकरी.त्याच प्रमाणे" ह.भ.प. गणपतराव फारक " हे जवळच्या नात्यातले आजोबा "महिन्याचे वारकरी ".त्यामुळे भजन,कीर्तन, नामस्मरण यांनी वातावरण भारलेले होते. दररोज संध्याकाळी शाळेतून घरी आलो की आमच्या ओसरीवर "फारक आजोबा "आम्हां मुलांना भजन म्हणायला शिकवत असत ,अभंग पाठ करून घेत असत. साधारण 50/60 मुलं असत.एक तास भजन चालायचे.रात्री अभ्यास, जेवण झाले की,पुन्हा आजोबा रामायण, महाभारत, संतांच्या कथा सांगत असत. त्यामुळे भक्तिरसाने चिंब भिजलेले असे ते दिवस होते. त्यामुळे आपोआपच संतांची चरित्रे वाचणे,त्यांच्या जीवनातून काय बोध ...