पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणीतली माणसं ‐ 11

इमेज
थोर समाजशिक्षक व माझे सदगुरू - श्री. श्रीपाद नागेश जोशी ऊर्फ बंडामामा !       एकोणीसशे पन्नासचे दशक. मी ऊत्तूरला आजोळी राहत होतो. माझे वय पाचसहा असावे .त्यावेळची गोष्ट. दसरा झाल्यावर कोजागिरी पौर्णिमा झाली की वेध लागायचे ते दिवाळीचे.तसेच आणखी एका गोष्टीची ओढ असायची ती म्हणजे "विठ्ठल मंदिरातील काकडआरतीची. अजूनही मला ती ऊत्तूरातील विठ्ठल मंदिरातील काकड आरती अगदी स्पष्ट ऐकू येते.काकड आरतीचा संस्कार इतका खोलवर रूजला आहे की ,आपोआपच मन भूतकाळात जाते.ऊत्तूरला त्या काळात अद्यापही वीज आली नव्हती. संध्याकाळी अंधार पडू लागला की ग्रामपंचायतीचा शिपाई प्रत्येक गल्लीच्या कोपर्याला एक खांब असायचा त्या खांबावर एक कंदील असायचा तो लावण्याचे काम हा शिपाई करीत असे. एवढा उजेड सोडला तर सारे गांव मिट्ट काळोखात गुडुप्प होऊन गेलेले असायचे. पहाटे चारच्या सुमारास कोंबडा आरवला की गांव जागं व्हायचं. पण कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा महिना भर मात्र "काकड आरतीनं" जाग यायची.पहाटे चारच्या सुमारास माझी "आजी" जागी होऊन मला ऊठवायची आणि आंघोळ करून आम्ही दोघे त्या अंधारात कंदील घेऊन विठ्ठल...